निसर्गशास्त्र (पंचतत्त्व/पंचमहाभूत)

Pancha tatva

संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि विनाशास कारणीभूत असणारे मूलभूत पाच नियम म्हणजे ‘पंचतत्त्व’. यालाच ‘पंचमहाभूत’ असेही म्हणतात. ‘भूत’ म्हणजे अविनाशी सूक्ष्म मूळ, जे पुढे कोणत्याही आकारास येऊ शकते. उदा. बीजापासून रोप निर्माण होते किंवा मृत्यूनंतर आत्मबीज पुन्हा जन्म घेऊन पल्लवित होते.

पाच तत्त्वं म्हणजे – आकाशतत्त्व, वायुतत्त्व, अग्नितत्त्व, जलतत्त्व आणि पृथ्वीतत्त्व.

संपूर्ण ब्रह्माण्ड पंचतत्त्वांच्या सूक्ष्म कणांनी (ऊर्जेने) भरलेले आहे. तत्त्वांच्या परिवर्तनातून चराचरात बदल घडत असतात. मानवी देहात घडणाऱ्या प्रत्येक बदलास पंचतत्त्वे कारणीभूत आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांप्रमाणे या तत्त्वांमध्येदेखील बदल होतात. जसे की, सूर्य उगवल्यावर अग्नितत्त्व वाढते, ज्यामुळे जलतत्त्व कमी होते. म्हणजेच जलतत्त्व हे अग्नितत्त्वामध्ये परिवर्तित होते. तत्त्वकण सर्वत्र असल्यामुळे याचा परिणाम सर्व चराचरावर होतो. मानवी देहातील तसेच प्रत्येक वस्तूतील अग्नितत्त्व वाढते. स्वभाव म्हणजेच मनातील भावदेखील पाच तत्त्वांवर आधारित असतो. दाहक विचार अग्नी प्रदर्शित करतात, तर चंचल विचार वायू. हळवेपणा जल प्रदर्शित करतो, तर आत्मविश्वास पृथ्वी. शांत स्वभाव आकाश दर्शवितो. अन्नातूनदेखील हीच पंचतत्त्वे शरीरास मिळत असतात. कोणत्याही कारणाने पंचमहाभूतांचे झालेले असंतुलन रोगास कारण ठरते.

पृथ्वीतत्त्व

निसर्गातील सर्व टणक भागांमध्ये प्रमुख तत्त्व हे पृथ्वी असते. शरीरासाठीही हाच नियम लागू पडतो. शरीरातील कठीण भाग जसे की, हाडे, अस्थिबंधन, स्नायुबंध, केस, दात, कुर्चा तसेच पेशींच्या वरील आवरण, पोकळ अवयव अथवा शिरा/वाहिन्यांचे आवरण, मज्जातंतू इ. मुख्यत्वे पृथ्वीतत्त्वापासून निर्माण होतात. त्याचप्रमाणे स्नायू, मेद, अस्थिमज्जा, वीर्य यांच्या निर्मितीत पृथ्वीतत्त्वाचा जास्त सहभाग असतो.

शरीरातील सर्व टणक रचना, साचा व संपूर्ण आधार व्यवस्थेला कणखरता आणि अखंडता देण्याचे काम पृथ्वीतत्त्व करते. इतर चारही तत्त्वांचे संतुलनही अत्यंत महत्त्वाचे असते. सेवन व उत्सर्जन या क्रियांमुळे शरीरातील पृथ्वीतत्त्वाचे संतुलन होते.

Pruthvitatva
Jal Tatva

जलतत्त्व

ओज म्हणजे शारीरिक ऊर्जेचा साठा हा कफ म्हणजेच जल व पृथ्वीपासून मिळतो. जे शरीराला मूलभूत पोषण देते. जल हे शरीराचे संरक्षक तत्त्व आहे. हे आकाशतत्त्वाचे नष्ट होणे, वायूचे खवळणे आणि गती तसेच अग्नीच्या उष्णतेपासून शरीराचे संरक्षण करते. शरीरातील दाह/जळजळ किंवा वेदना जलतत्त्वामुळे शांत होतात.

शरीरात पाच प्रकारचे कफ (जल+पृथ्वी) आहेत.

१) अवलंबक कफ – हा कफ छातीत स्थित असून, संपूर्ण श्वसन प्रणाली ओलसर आणि स्निग्ध ठेवते.
२) क्लेदक कफ – हा कफ पोटात आलेल्या कडक/जड अन्नपदार्थास ओले करतो. तसेच आपल्या पोटातील श्लेष्मल त्वचेचे आम्लांपासून  (ॲसिड) संरक्षण                                      करून पचनास साहाय्य करतो.
३) बोधक कफ – हा कफ म्हणजे लाळ असून चव समजून घेण्यात तसेच पचनात हा कफ मदत करतो.
४) तर्पक कफ – हा कफ डोक्यात स्थित असून, हा ज्ञानेंद्रियांचे पोषण करतो आणि मेंदूतील मज्जातंतूंचे संरक्षण करतो.
५) श्लेषक कफ – सांध्यात स्थित असा हा कफ (वंगण) सांध्यांना स्निग्धता व ताकद देतो. घर्षणापासून सांध्यांचे रक्षण करतो.

अग्नितत्त्व

शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये अग्नीचे अस्तित्व आहे. आपल्या शरीरातील पित्त हे अग्नी आणि जलापासून निर्मित होते. तेज म्हणजेच आंतरिक चमक ही अग्नीपासून मिळते. आयुर्वेदानुसार पचन आणि चयापचय प्रक्रियेमधील ‘अग्नी’ हा महत्त्वपूर्ण घटक आहे. खाल्लेले अन्न पचविणे, शोषणे व रूपांतरित करणे ही कार्ये अग्नीद्वारे केली जातात. अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम अग्नी करतो. शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी जसे की, पोषण, ताकद, वासना, कांती, जगण्याची ऊर्मी, आरोग्य, ओज, तेज आणि प्राण (जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा) या सर्वांसाठी अग्नीच कारणीभूत आहे. चरक ॠषींनी नमूद केले आहे की, जेव्हा शरीरातील अग्नी संतुलित असतो, तेव्हा व्यक्ती निरोगी, दीर्घ व आनंदी आयुष्य जगते, अग्नी असंतुलित असल्यास अनारोग्य किंवा आजार उद्भवतात. मात्र जेव्हा अग्नीचे कार्य थांबते, तेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो. शरीरात 13 प्रकारचे अग्नी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 1 जठराग्नी, 7 प्रकारचे धत्वाग्नी व 5 प्रकाराचे भूताग्नी.

१) जठराग्नी – पोट व पक्वाशय हे या अग्नीचे स्थान असून आलेल्या अन्नाचे पचन व चयापचय या प्राथमिक क्रिया जठराग्नीमुळे होतात.
२) धत्वाग्नी – जठराग्नीमार्फत पचविले गेलेले अन्न धातूंच्या सारात रूपांतरित होते. धत्वाग्नी, त्याचे सप्त धातूंमध्ये (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र/रज)                         रूपांतर करतो.
३) भूताग्नी – भूताग्नीमार्फत (भौमाग्नी/पार्थिवाग्नी, आप्याग्नी, आग्नयाग्नी, वायव्याग्नी, नाभसाग्नी) सप्तधातूंमध्ये रूपांतरित अन्नाचे पंचमहाभूतांमध्ये रूपांतरण केले                        जाते.

Agni Tatva
Vayu Tatva

वायुतत्त्व

प्राण म्हणजे जीवनशक्ती ही वात म्हणजेच वायू व आकाशापासून मिळते. वहन हे वायूचे मुख्य कार्य असून, वायू जेव्हा नाड्यांमधून मुक्त प्रवाहित होतो, तेव्हा स्नायू, मज्जातंतू, पेशी, अवयव आणि शरीरातील सर्व भागांना पोषण, चैतन्य, चालना आणि सर्वसमावेशक आरोग्य प्रदान करतो.

शरीरात पाच मुख्य प्राण (वायू + आकाश) असतात.

१) प्राण – हा ऊर्जेचा प्रवाह असून छातीच्या भागात कार्यरत असतो. हृदय, फुप्फुसे यांना सक्रिय ठेवतो.
२) अपान – हा ऊर्जेचा प्रवाह नाभीच्या खाली ओटीपाटाच्या भागात कार्यरत असतो. मोठे आतडे, मूत्रपिंड, गुदद्वार आणि जननेंद्रियांना ऊर्जा देतो.
३) समान – हा ऊर्जेचा प्रवाह हृदय व नाभी यामध्ये कार्यरत असतो. यकृत, आतडे, स्वादुपिंड आणि पोट यास ऊर्जा पुरवितो.
४) उदान – हा ऊर्जेचा प्रवाह मान व डोके या भागात कार्यरत असतो. डोळे, जीभ, नाक आणि कान या ज्ञानेंद्रियांना सक्रिय करतो.
५) व्यान – हा ऊर्जेचा प्रवाह संपूर्ण शरीर व्यापून टाकतो. शरीराच्या हालचाली नियमित आणि नियंत्रित करणे तसेच इतर प्राणांशी समन्वय साधणे आणि त्यांना                     शक्ती प्रदान करणे ही याची मुख्य कार्ये आहेत.

आकाशतत्त्व

आकाशतत्त्व सर्वव्यापी आहे. ते सर्वत्र आहे. त्याला मर्यादा नाही. आकाश स्थिर आहे, कारण त्यात वायूची चंचलता नाही. आकाश थंड आहे, कारण त्यात अग्नीची उष्णता नाही. आकाश हलके आहे, कारण त्यात जल आणि पृथ्वीचे जडत्व नाही. मात्र आकाशतत्त्वातूनच इतर तत्त्वांची उत्पत्ती असल्यामुळे, ते सर्वांचे मूळ किंवा पाया आहे. यात इतर चारही तत्त्वे सुप्तावस्थेत समाविष्ट असतात.

Akash Tatva

स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे

Spiritual science – Sapt Kosh

अध्यात्मशास्त्र

अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...

Naturopathy

निसर्गशास्त्र : पंचतत्त्व

संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...

Nadis and Chakras​

योगशास्त्र : सप्तचक्रे

मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....

The Science of Mudra​

मुद्राशास्त्र

मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...

Psychology

मनोविज्ञान

आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...

Akshar Brahma

अक्षरब्रह्म

क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!