पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत 'निरामय वेलनेस सेंटर'ची दिवाळी
पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत 'निरामय वेलनेस सेंटर'ची दिवाळी
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. त्या स्वप्नांना पुन्हा पंख देण्यासाठी निरामय वेलनेस सेंटरने डॉ. मिलिंद भोई यांच्या भोई प्रतिष्ठानच्या सहकार्याने अर्धापूर तालुक्यातील शाहापूर येथील शेतकऱ्यांना बियाणे आणि जैविक खतांचे वाटप केले. या वेळी दिवाळीचा फराळ, साडीचोळी देऊन अत्यंत भावनिक वातावरणात भाऊबीज साजरी करण्यात आली. सेंटरच्या संचालिका अमृता चांदोरकर यांनी या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांशी मनमोकळेपणे संवाद साधला.