टीबी पूर्णपणे बरा करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

क्षयरोग किंवा टीबी हा एक संसर्गजन्य व जीवघेणा आजार. श्‍वासावाटे, खोकला किंवा शिंकण्याद्वारे हा आजार शरीरात प्रवेश करतो आणि आपल्या फुफ्फुसांवर दुष्परिणाम करतो. टीबी होण्याचं मुख्य कारण म्हणजे दूषित वातावरण. मुंबईसारख्या महानगरात जिथे लोक दाटीवाटीने रहातात अशा ठिकाणी ह्या रोगाचा प्रसार जलदगतीने होतो. पण हा रोग होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी कमी असणं.
पूर्वी टीबीवर उपचार नव्हते. आता टीबीसाठी मॉडर्न सायन्सने औषधं शोधून काढलेली आहेत. पण टीबी हा एक असा आजार आहे, जो औषधांनी बरा झाला तरी पुन्हा पुन्हा होऊ शकतो. नंतर एक वेळ अशी येते की त्यातून माणूस कधीच बरा होऊ शकत नाही. अर्थात मॉडर्न सायन्सकडे त्यासाठी पर्याय नाही. परंतु प्राचीनआरोग्यशास्त्रावर आधारित स्वयंपूर्ण उपचार पध्दतीने कोणत्याही स्थितीतला टीबी बरा करता येऊ शकतो.

टीबी झाल्याची मुख्य लक्षणे म्हणजे वारंवार होणारा सर्दीी-खोकला, कफावाटे रक्त पडणे, ताप, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे. त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन रिपोर्ट काढल्यास टीबीचे निदान होते. यावर मॉडर्न सायन्सला देखील खूप काळ उपचार करावा लागतो. पण या औषधांचाही माणसांवर साईड इफेक्ट्स होतच असतो. यातून रूग्ण बरा होतो. पण या औषधांनी रूग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढली जात नाही. त्यामुळेच बरे झाल्यावरही रूग्णाने जर खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याला पुन्हा टीबी होण्याची संभावना असते.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे या रोगावर उपचार करताना शरीरातील दूषित ऊर्जा आधी बाहेर काढली जाते. त्याचबरोबर त्या रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवली जाते. त्यामुळे हा दोष पूर्णपणे निघून जाऊ शकतो.
अर्चना रावले ह्या दिसायला खूप सुंदर-गोर्‍यापान. त्यांना 3 वेळा टीबी झालेला होता. त्यातून बरे होण्यासाठी शरीरावर औषधांचा इतका मारा झाला की सुंदर दिसणारी ही महिला अक्षरशः काळवंडून गेली होती. तिसर्‍यांदा टीबी झाल्यावर तर डॉक्टरांनी फुफ्फुसाचा काही भाग खराब झाल्याने ऑपरेशन करण्यास सांगितले होते. एखादा अवयव खराब झाला की मॉडर्न सायन्सकडे तो कापून किंवा काढून टाकण्याचा मार्ग वापरला जातो. पण ह्या ऑपरेशन्ससाठी डॉक्टरांनी त्यांना 8 महिन्यानंतरची अ‍ॅपॉईंटमेंट दिली होती. या काळात अर्चना रावले निरामयमध्ये आल्या. त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घ्यायला सुरूवात केली. 8 महिन्यांनी त्या पुन्हा डॉक्टरांकडे गेल्या तेव्हां त्यांनी त्यांच्या टेस्ट केल्या आणि ते आश्‍चर्यचकित झाले. कारण फुफ्फुसाचा जो भाग खराब झाला म्हणून ते काढून टाकणार होते, तो आता पूर्णपणे कार्यरत होता. शिवाय अर्चनांची तब्येतही छान झालेली होती. हे निरामयच्या ट्रीटमेंटचे फार मोठे यश आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये अवयव कधी मृत होत नाही. त्या अवयवाला योग्य ऊर्जा आणि ताकद दिली तर तो पुन्हा कार्यक्षम होऊ शकतो, हे आम्ही सिध्द करून दाखवलेले आहे.

टीबीला आयुर्वेदात क्षयरोग असे म्हटले आहे. ह्या रोगात फुफ्फुसे निकामी झाल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे भूक मंदावणे, अशक्तपणा येऊन शरीराची झीज म्हणजेच क्षय होतो. पूर्वी ह्यासाठी प्रभावी औषधे नव्हती. पण आत्ताच्या औषधांनीही शरीरावर दुष्परिणाम होतो हेही तितकेच खरे ! इथे स्वयंपूर्ण उपचार पध्दतीने उपचार घेणेच योग्य व प्रभावी ठरते. कारण कोणतीही औषधे नाहीत. उलट रोगप्रतिकारक शक्ती वाढविली जाते.
सुरेखा पेंढुरकर ह्यांना टीबीचे निदान झाले. 3 महिने औषधे घेऊनही फरक पडेना तेव्हां काहीशा शंकेनेच त्या निरामयमध्ये आल्या. 15 दिवसात फरक जाणवू लागला. ट्रीटमेंट घेत राहिल्या. पुढे 6 महिन्यात त्यांना इतके बरे वाटू लागले की त्यांनी त्यानंतर औषधांची एकही गोळी घेतली नाही. आज त्यांचा टीबी पूर्णपणे बरा होऊन त्या आनंदात जगत आहेत.

असाच एक अनुभव मुळातल्या मुंबईकर आणि नंतर पुणेकर झालेल्या हिराबाई भागवतांचा. त्यांना अनेक वर्षे टीबीचा त्रास होता. श्‍वास कमी पडत असे. खोकला इतका की कफावाटे वाटीभर रक्त पडत असे. त्यामुळे अ‍ॅनेमिक कंडिशन. फुफ्फुसे इतकी निकामी झालेली की, डॉक्टरांनी त्यांना 3 महिने जगू शकतील असे सांगितले होते. अशा अवस्थेत त्या निरामयमध्ये आल्या आणि ट्रीटमेंट सुरू केली. 15 दिवसात चेहर्‍यात फरक जाणवला. रक्त पडण्याचे प्रमाण किंचित कमी झाले होते. पुढे रेग्युलर ट्रीटमेंट घेऊ लागल्यावर त्या पूर्णपणे बर्‍या झाल्या. डॉक्टरांनीही ज्यांच्या आयुष्याची आशा सोडली होती अशा हिराबाई आज आनंदात जगत आहेत, सर्व कामे करत आहेत. यातलंच आणखी एक उदाहरण उज्वला पाटकर ह्या तरूणीचं. लहान वयातच टीबीचं निदान झालेलं. चालता चालता तोल जाऊन पडायची. इंजेक्शनं व औषधांनी शरीराची चाळण झालेली आणि त्रासही व्हायचा. म्हणून तिने औषधंही घेणं बंद केलेलं. चेहरा काळवंडलेला, आत्मविश्‍वास गमावलेला अशा परिस्थितीत तिने निरामयची ट्रीटमेंट सुरू केली आणि काही काळातच ती टीबीतून बाहेर आली आणि आता सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे.

वर सांगितलेली ही तीनही उदाहरणे म्हणजे टीबीच्या टीपेला गेलेल्या केसेस म्हणाव्या लागतील. निरामयमध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे बरे करून त्यांचं आनंदी आयुष्य त्यांना परत मिळवून दिलं. शेवटी प्रत्येकाला आजारातून बरं व्हायचं असतं. मग औषध कोणतंही असो. पण आम्ही म्हणतो, औषधं तरी कशाला? तुम्ही निरामयमध्ये या आणि फक्त विश्‍वास व श्रध्दा ठेवून उपचार घ्या. तुम्ही बरे होणारच. आमच्याकडे येणार्‍या प्रत्येक रूग्णाशी बोलताना आमचं पहिलं वाक्य हेच असतं की, काळजी करू नका. तुम्ही यातून बरे होणार आहात !

टीबी म्हणजेच क्षयरोगाविषयी मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!